मंगळवार, १६ ऑगस्ट, २०११

चाल पुढे...


तू चाल पुढे तरुणा
माघार न घेणे आता, हा ठरला आपुला बाणा

फौज ठाकली अकबरची मोठी
राजपूत सैन्याची लागली कसोटी
जमवून इमानी भाले,हळदी घाटी झुंझला राणा

कलंक शिव वैभवास जणू
सिंहगडावर उदयभानू
पुत्र विवाह सारून बाजूला,लढवायला गेला ताना

उभी सामोरी मालिका संकटांची
सत्कार्य करतांना चिंता नको त्याची
आडव त्यांना होऊन धैर्यमेरु,कितीही येऊ दे त्या संकटांना

ज्ञान करून घे तू सर्वंकष
चरित्र्यावरही नसू दे कलंक
एकटा करून भारतीयांची,बलवान कर संघटना

२ टिप्पण्या: