शुक्रवार, ८ जुलै, २०११

जोडीदार

बोलायचा प्रयत्न केला तर
मनातले शब्द ओठांवर येऊन थांबतात
बोलणार तरी कोणाशी कारण
सगळे आपले असून परके वाटतात

नाते जुळवणे सोपं असतं 
पण नात्याना जपणं तितकच अवघड असतं 
नात्यांची जर जुळली जोडी
तर खरी जीवनात टिकते गोडी

जोडीत असते माय लेक, बाप लेक 
नणंद भावजय किंवा सासु सून 
असतात त्यात दिर जाऊ,  इतर नातेवाईक 
नवरा बायको यांची जोडी मात्र असावी लाखात एक 

टिकवाल जोडी,  टिकवाल नाती जर योग्य प्रकारे, 
तर आणि तरच आयुष्याची होईल सफलतेने नाव पार 
म्हणून तर म्हटलं आहे नका करू व्यभिचार, 
टिकवा आपल्या नात्याचा जोडीदार 

सौ अर्चना दीक्षित 
मुंबई 







कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा