शनिवार, ३१ ऑक्टोबर, २०२०

वेल संसाराची

 टाळी नसते एका हाताची,

तशीच गत संसाराची 


दोन जीवांचे असती बंध, 

जणू आयुष्यभर दरवळी सुगंध 


पती पत्नी म्हणून होतो आरंभ,

नाजुकशा नात्याचे ते आधारस्तंभ


बंध रेशमाचे घेत जुळवून,

परिपक्व नात्याला देत उजळवून


जाणून भावना एकमेकांच्या, 

अलगद मनातील अंतरीच्या 


हात हातात देऊन संयमाने,

आधार बनत केवळ नजरेने 


भातुकलीचा हा नसे खेळ,

दोन जीवांचा इथे असे मेळ


भक्कम पायाची ही वेल संसाराची,

उलगडत जाणारी ही वाट आयुष्यभराची


सौ अर्चना दीक्षित 

मुंबई 

गुरुवार, २९ ऑक्टोबर, २०२०

माझे बाबा

धीर, गंभीर आणि खंबीर, 

वेळ पडल्यास मजेशीर 


प्रेम, आत्मियता, जिव्हाळा,

वेळोवेळी लावतात लळा 


कोणी म्हणे यांना भक्कम आधार, 

कुटुंबासाठी करतात कष्ट अपार


कधी मृदु तर कधी कठोर,

त्यांच्या धाकाने सुधरते पोर 


कष्टाची झळ लागू नाही देत कधी, 

संसाराची जवाबदारी स्वीकारतात सगळ्यात आधी


त्यांच्या नसण्याने विसकटते घर, 

अस्तित्वानेच त्यांच्या येई बहर 


सौ अर्चना दीक्षित 

मुंबई 

 

परिक्षा जीवनाची

कधी चढ उतार 

तर कधी कष्ट अपार 

कधी सुखाचे डोंगर 

तर कधी दुःखाचा भार

कधी भावनिक गुंतागुंत

तर कधी कशाची खंत 

कधी यशाने येते बळ 

तर कधी अपयशाची झळ

याची कोणाला वाटे शिक्षा 

कोणी म्हणेल देव घेतो परिक्षा 

यावर हसतमुखाने सामोरे जावे 

असेल त्या परिस्थितीला संधी मानावे

संधीला बनवा सकारात्मक बदल

तर पहा होई जीवन सफल


सौ अर्चना दीक्षित 

मुंबई  

शुक्रवार, २३ ऑक्टोबर, २०२०

जरासी सावधानी

त्योहारोंका मौसम आया है, 

पर करोना का डर नही गया है। 


जीवनको अपने दो गती, 

इससेही होगी देशकी प्रगती। 


याद रखना मित्रों एक बात, 

जरासी लापर्वाही करेगी घात।


मानव को बचाने आए मानवतावादी, 

संभलकर रहोगे तो ना होगी बर्बादी। 


जनजागृती एक अभियान बनाओ,

जागरुकताही संदेश फैलाओ।


अर्चना दीक्षित  

गूज अंतरीचे

 अंतरीच्या भावनांना आज 

शब्दात व्यक्त करु कशी, 

स्पर्शात तुझ्या मोहून जाते, 

प्रित वेडी प्रेयसी जशी 


वेली झाडात गुफणे 

साजणा कळते कसे, 

शब्द वेड्या लेखकाला 

शब्द सुचतात जसे


क्षितीजावर मृगजळाचे

खेळ का कोणास दिसे, 

मृगनैनाच्या शोधार्थ आज

मन जणू वेडेपिसे 


गूज आहे अंतरीचे 

भावूनी जाते कसे, 

सख्या तुझ्या भेटीत 

आज मी मोहूनी जाते जसे


सौ अर्चना दीक्षित 

मुंबई 


शब्दांचा खेळ

 कोणाचे बोलके शब्द 

तर कोणी निःशब्द, 


बोलके शब्द कधी अबोल करी, 

तर निःशब्दात देखील भावना खरी 


कोणी शब्द संहार करुन रणांगण गाजवी,

तर कोणी निःशब्द राहूनही मन खुलवी 


शब्द कोणाचे कधी जुळवी मन, 

निःशब्द देखील पेटवी रण 


जपून असावे शब्दांचे खेळ, 

नाहीतर निःशब्द व्हायला नाही लागत वेळ 


शब्दांनीच कधी माणसे पेटतात, 

तर निःशब्द राहूनही नाती जुळतात 


सौ अर्चना दीक्षित 

मुंबई 


विद्येची देवता सरस्वती

 छडी लागे छमछम विद्या येई घमघम,

लहानपणी हे शिकलो आपण सर्वात प्रथम 


काही जण परीस्थितीवर मात करुन शिकतात,

तर काही आहे त्या परिस्थितीत शिकतात 


ते शिक्षण पुस्तकी ज्ञान असो, 

वा आयुष्यात मिळणाऱ्या अनुभवांचे असो 


विद्येची देवता ही सरस्वती देवी,

निपुणता मिळवण्यास विद्या हवी 


आपल्या प्रयत्नांची देखील शिकस्त करु, 

योग्य शिक्षण मिळण्यास परीस्थितीवर मात करु 


या शारदेला करुन वंदन,

कोणत्याही क्षेत्रात प्रगती करु आपण 


सौ अर्चना दीक्षित 

मुंबई 


मुक्त विचार

विषय आजचा मुक्त विचारांचा,

शब्दांतही बांधणे झाले कठीण 


निसर्गाच्या अमाप संपत्तीला,

आज शब्दात बांधणे झाले कठीण 


नात्यांच्या त्या अलगद धाग्यांना,

आज शब्दात बांधणे झाले कठीण 


तिने त्याच्या,  त्याने तिच्या भावनांना 

आज शब्दात बांधणे झाले कठीण 


विषय नसला कवीच्या शब्दांना, 

तर विचारांना आवर घालणे कठीण 


विषय उद्याचा द्या आवडीचा,

तर शब्द गुंफणे नसे कठीण 


सौ अर्चना दीक्षित 

मुंबई  

सोमवार, १९ ऑक्टोबर, २०२०

करू गौरव मानवाचा

जान है तो जहान है, 

हे वाक्य खर आहे 


आज याची खरी येते प्रचिती,

प्रत्येकाला आहे जीवाची भीती


माझे कुटुंब माझी जबाबदारी, 

याची प्रत्येक जण घेतं खबरदारी 


आज मानवाने मानवतेची राखली लाज, 

म्हणून तर मोठ्याप्रमाणात जीवितहानी टळली आज


करुयात गौरव मानवतेचा, 

भीषण परिस्थितीत लढणाऱ्या योद्धांचा


एकमेका साह्य करू अवघे धरू सुपंथ, 

हेच सांगत आहेत आपले महान ग्रंथ 


आपल्या देशाची हीच आहे महानता, 

येथे जपली जाते मानवता 


सौ अर्चना दीक्षित 

मुंबई

शनिवार, १७ ऑक्टोबर, २०२०

ममता

मायेची ममता 

असते त्यात समानता 


मुलगा, मुलगी फरक नसतो, 

लहान,  मोठ्याची तुलना नसते 


नि:स्वार्थ तिचे प्रेम असते, 

मुलांचे भविष्य तिला घडवायचे असते


वेळ पडल्यास ती कठोर बनते, 

तरच तर घडलेली चूक मुलांना कळते 


ममतेला तिच्या अंतर देऊ नका कधी, 

नमन करा तिला सत्कार्य करण्या आधी


दूर गेली मुलं जरी 

आईची नजर नेहमी त्यांच्यावरी


सौ अर्चना दीक्षित 

मुंबई 


 

तळ्याकाठी

 आजही मनी साठवते त्या जुन्या आठवणी, 

डोळ्यासमोर उभ्या असतात क्षणोक्षणी 


ती तळ्याकाठीची आपली पहिली भेट, 

फक्त नजरेने घायाळ केले मला थेट


मग हळूवार तुझ्या हातांचा स्पर्श,

गालावर उमले प्रीतीचे हर्ष 


तेव्हढ्यात पाण्याच्या आवाजाने डोळे उघडतात,

कसले तळे नी कसला स्पर्श,

पाणी भरण्यासाठी बादल्या हाती येतात


स्वप्नांच्या दुनियेत जाऊन परत यायचं असतं, 

कारण सत्याचं जग वेगळच असतं 


सौ अर्चना दीक्षित 




तू दुर्गा तू चण्डीका

 काळाची मला गरज बनायचंय, 

बाबांची लाडकी परी बनण्याबरोबरच

मला बाबांची शेरनी बनायचयं


स्री हे देवीचं रूप, हे वाक्य खर करायचं, 

मां दुर्गा बनण्याबरोबर

मां चण्डीचे रूपही दाखवायचं


स्रीच्या अनेक भूमिकांमधून मला जायचय,

या भुमिका संभाळण्याबरोबर

वाईट नजरेने पाहणाऱ्यांना माझं खरं रूप दाखवायचं 


बलात्कारी नराधमांना धडा शिकवायचायं,

मुलींना सक्षम बनवण्याबरोबर

मुलांना देखील मर्यादा पुरुषोत्तम बनवणे गरचेयं


सौ अर्चना दीक्षित 

मुंबई 

मंगळवार, १३ ऑक्टोबर, २०२०

संविधान - देशाचा श्वास

उगाच नको कसलाच फार्स,

आणि नको कोणाच्या भावनांचा ह्रास 


एकत्मतेने राहूयात आसपास,

हेवेदावे आता करा की हो बास


आता मनात भावना ठेवा खास, 

नका होऊ देऊ कोणाला उदास 


हाच आहे आपल्या संविधानाचा इतिहास, 

पालन करुयात त्याचे हमखास 


तुम्ही आम्ही जाती भेद नष्टच करुयात,

स्वबळावर जग जिंकूयात


जातीच प्रमाणपत्र रद्द करुयात, 

आरक्षण रद्द होण्याची संधी शोधुयात 


आता आपला असावा एकच ध्यास, 

कारण आपले संविधान आपल्या देशाचा श्वास 


सौ अर्चना दीक्षित 

मुंबई

सोमवार, १२ ऑक्टोबर, २०२०

माझी लाडाची लेक

मुलगा असतो 
वंशाचा दिवा,
तर मुलगी असते 
दिव्याची वात 

मुलगा असावा 
मर्यादा पुरुषोत्तम, 
तर मुलीला असावी 
मर्यादांची जाणीव 

आता नाही कोणी करत 
अर्भकाची लिंग चाचणी,
उलट मुलगी हवी म्हणून 
करतात देवाकडे मागणी 

लेकीच्या ठाई असते 
माया आभाळाची,
माहेरची लाडकी,
होते सुन दिल्या घरची

म्हणून तर केले मी 
देवाजवळ नवस अनेक, 
मुलगा झाला आता हवी 
मला लाडाची लेक 

सौ अर्चना दीक्षित 
मुंबई 


उत्सव नात्यांचा

नातीगोती काळाप्रमाणे बदलत असतात, 
प्रत्येक क्षणाला साथ देतात, तीच खरी नाती असतात 

नात्यात असतात,  मित्र मैत्रिणी,  सखे सोबती, 
जे असतात आपल्या अवतीभवती 

कोणत्याही परिस्थितीत धावून येणारे 
सुख दुःखातही तारून नेणारे

भेटवस्तुंचा जिव्हाळा नसतो, 
फक्त भेटीचा लळा असतो 

या नात्याला नाव ठेवायचे नसते, 
याला योग्य नाव द्यायचे असते 

भेटल्यानंतर उत्साहाला उधाण येतं,
उत्सवात नात्यांच्या असच असतं 

सौ अर्चना दीक्षित 

शनिवार, १० ऑक्टोबर, २०२०

माय बाप देव खरे

कोणत्याही विषयावर शब्दांची जुळवाजुळव 

कदाचित सोपी असेल, 

पण आई वडीलांची महती लिहीता लिहीता

एक आयुष्य अपुरे पडेल 


आजच पहा ना विषय लेखनाचा

अवघड वाटू लागला, 

लेखणी हातात घेऊन

प्रत्येक जण शब्द जुळवू लागला


मनी शब्दांची साठवण करुन 

आठवणी आठवू लागला,

तरीही शब्दांच्या अंगणात 

तो योग्य शब्द वेचु लागला 


आठवणींनी माय बापाच्या

उर भरून येत असे रे,

म्हणूनच तर पटते 

माय बाप हे खऱ्या अर्थी देव खरे 


सौ अर्चना दीक्षित 

मुंबई 




भाईचारा

काहे रचाते हो ऐसा खडयंत्र,

अपनोसे अपनो के विरूद्ध का है ये षडयंत्र।


कबतक करोगे जाती का नाम लेकर राजनीती,

ये कैसी कर रहे हो कुटनिती। 


क्युं करते हो जाती का नाम लेकर प्रचार, 

अरे नही चाहिए हमे ऐसी सरकार।


कसम खातें है, हम नही लेंगे जाती का आधार, 

खुदके बलबूतेपर चलाएंगे कारोबार।


यही वजह है, जिससे बन गए अपने भी पराए, 

भूल जाओ ये सब, चलो फिरसे भाईचारा बढाए।


अर्चना दीक्षित  

लोककला

आजकाल लोककला ही एक झाली आहे फॅशनच,

चांगल आहे ना,  त्यामुळे होत आहे आपल्या संस्कृतीचे जतन 


पर्यटकांसाठी झालय नवीन आकर्षण,

त्यामुळे आपल्या गावाचं होतय संगोपन 


आदिवासी पाडेदेखील टुमदार सजतात,

फॅशन म्हणून का होईना,  लोक आकर्षित होतात 


जाऊयात एकदा गावाकडे लोककला पहायला, 

आजकालच्या पिढीला याची जाणीव करून द्यायला 


आपणच जपली पाहीजे आपली संस्कृती, 

तरच तर होईल आपल्या देशाची प्रगती 


आपल्या देशातच काय पण याची महती सर्वत्र पोहोचवू,

आपल्या लोककलेला इंटरनॅशनल प्लॅटफॉर्म देवू 


सौ अर्चना दीक्षित 

मुंबई

गुरुवार, ८ ऑक्टोबर, २०२०

तू चांदणी नभातली

सप्तर्षींच्या मैफिलीतली

तू चांदणी नभातली 


अनेक तारकांनी वेढलेली

तू चांदणी नभातली


तरीही स्वतःचे अस्तित्व टिकवलेली 

तू चांदणी नभातली 


चंद्रालाही भाळलेली 

तू चांदणी नभातली


कवी कल्पनेची सावली

तू चांदणी नभातली


रात्रीच्या अंधारात सावरलेली 

तू चांदणी नभातली


कोमलतेने सजलेली 

तू चांदणी नभातली 


सौ अर्चना दीक्षित 

मुंबई

मंगळवार, ६ ऑक्टोबर, २०२०

स्वत्त्वाचा शोध*

 *स्वत्त्वाचा शोध* 


शोध माझ्या मनाचा  

माझ्या अंतरातील भावनांचा 

कन्येतून *स्रीत्त्वाचा*

स्रीतून *पत्नीत्त्वाचा*

पत्नीतून *मातृत्त्वाचा*

शोध माझ्या मनाचा 


असलेल्या परिस्थितीत समाधानाचा 

नकारापेक्षा सकारात्मकतेचा

जुळवलेल्या नात्यांचा 

शोध माझ्या मनाचा 


*शोध* स्वकर्तृत्वाचा

अंगी असलेल्या कला गुणांचा 

कोणत्याही परिस्थितीवर मात करण्याचा 

शोध माझ्या मनाचा 


शोध घेते शब्दांचा 

संग्रही साठवण्याचा 

साठवणीतील आठवणींचा 

शोध माझ्या मनाचा


सौ अर्चना दीक्षित 

मुंबई

बिनधास्त बंदिस्त

मी काय म्हणते,  कशाला मानायचे जीवनाला बंदिस्त,

त्यापेक्षा आपणच आपल्याला लाऊयात ना शिस्त 


डोळ्यासमोर उभी करून प्रतिमा एखादी भारदस्त, 

मग तसच बनायचं म्हणून काम करुयात रास्त 


इथे बाजारात मिळत नाही ना काहीही स्वस्त,

मग मुठ गिळून गरीबाच पोरगं शांत बसत


बाप ज्याचा श्रीमंत,  त्याच पोरग आहे बिनधास्त,

त्याच्या गावी कधी नाही,  काय महाग, तर काय स्वस्त 


आपल्याच मनात उगाच विचार घालतात गस्त, 

मुक्त करा विचारांना,  ठेऊ नका त्यांना बंदिस्त 


मग मन पाखरू भिरभिरतांना आपल्याला दिसत, 

व्हा कधीतरी बेफिकीर,  जगा एकदम बिनधास्त 


सौ अर्चना दीक्षित 

मुंबई

सोमवार, ५ ऑक्टोबर, २०२०

वेदना नव्हे संवेदना

स्री नेहमीच सक्षम होती, आहे आणि राहाणार,

स्रीयांनी घडवलेला इतिहास अजरामर राहणार 


तिला सहानुभूतीची गरज नसते,

बस प्रोत्साहनाची गरज असते


तिच्या वेदना तिची कमजोरी नसते, 

उलट संवेदनशील राहून आपले ध्येय साधते 


नारी ही केवळ अबला आहे,

हा तर फक्त बोलबाला आहे 


वेळ प्रसंगी ती भावुक बनते, 

वेळ आली तर ती शस्त्र हाती घेते


तिची लिला आहे अपरंपार,

म्हणून तर सुरू आहे हा संसार


सौ अर्चना दीक्षित 

मुंबई

रविवार, ४ ऑक्टोबर, २०२०

वळ उठला पाठीवर

 नियतीचा खेळ मांडला जीवन पटावर

जणू वळ उठला पाठीवर


विवाहित जीवनातील आठवणी कोरल्या आहेत मनावर

पण एका काळचक्राने घाव घातला आयुष्यावर 

जणू वळ उठला पाठीवर


ताबा राहत नव्हता मनावर 

घात हा पुरेल आयुष्यभर 

जणू वळ उठला पाठीवर


किती काळ लोटला आजवर 

उरलेल्या संसाराची जवाबदारी माझ्यावर

जणू वळ उडला पाठीवर 


पुन्हा नव्याने सुरू करेन सत्वर 

करून नव्या पार्श्वभूमीवर 

जरी वळ उठला पाठीवर


विश्वास आहे स्व कर्तुत्वावर

राहील ताबा ही मनावर 

जरी वळ उठला पाठीवर 


सौ अर्चना दीक्षित 

मुंबई 



गुरुवार, १ ऑक्टोबर, २०२०

Law Enforcement

Enough of this Brutality 

Have we all forgotten basic Humanity 


It's time to stand as one Nation 

Without any Caste or Religion 


Where is the law to punish these Inhumans,

Which will stop such act of Demons 


Enough of just lighting candle Entertainment,

Time to ask for strong law Enforcement 


Why do we think particular religion is getting Affected 

Rich or Poor, their mentality has got Infected 


02 Oct is known for Clean India Movement 

Swachha Bharat Abhiyan is incomplete without this  Law Amendment 


Archana Dixit 


 

इंसाफ

 ना जाने कब ये कायदा आएगा,

जो लडकीयोंको इंसाफ दिलाएगा। 


लडकों को भी दो सामाजिक ज्ञान,

औरतके प्रती सिखाओ सम्मान।


पेहराव पे लडकीके रखो नजर, 

वर्ना हो जाएगा एक दिन कहर।


जब तक बलात्कारीयोंको ना हो कठोर शिक्षा,

तब तक स्त्री को कैसे महसुस होगी सुरक्षा।


आज जन जन का बस यही नारा हो, 

महिलाओंकी सुरक्षा न गवारा हो। 


जब तक कठोर कायदा नही आएगा,

तब तक ये अत्याचार होता रहेगा। 


इसलिए कायदा कानून जरुरी है, 

तब तक न्याय व्यवस्था अधूरी है। 


अर्चना दीक्षित 





हृदयस्पर्शी

 मुलगी असो वा मुलगा असो 

बस समानतेची जाणिव असो 


पेहरावावर तिच्या असावी नजर

नाहीतर होऊन बसेल कहर 


मुलगा म्हणून सोडून देऊ नका हो

स्री चा आदर त्यालाही शिकवा की हो


नाहीतर हृदयस्पर्षी कहाण्यांना अंत नसेल

नात्यांचा देखील फडशा पडेल


सरकारी कायदा कधी निघणार 

बलात्कारांना घोर शिक्षा कधी मिळणार 


कायदा असेल तर चपराक बसेल 

मग वाईट नजर टाकायची हिम्मत नसेल


सौ अर्चना दीक्षित 

मुंबई