कधी चढ उतार
तर कधी कष्ट अपार
कधी सुखाचे डोंगर
तर कधी दुःखाचा भार
कधी भावनिक गुंतागुंत
तर कधी कशाची खंत
कधी यशाने येते बळ
तर कधी अपयशाची झळ
याची कोणाला वाटे शिक्षा
कोणी म्हणेल देव घेतो परिक्षा
यावर हसतमुखाने सामोरे जावे
असेल त्या परिस्थितीला संधी मानावे
संधीला बनवा सकारात्मक बदल
तर पहा होई जीवन सफल
सौ अर्चना दीक्षित
मुंबई
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा